२६ मे, २०११

मनाचिये गुंती---चौदा

मनातील स्वप्ने जेव्हा अस्तित्वात येणार असे भासू लागते तेव्हा कुठे जगण्याची मजा येवू लागते. पण अस्तित्व कधी हि एकट येत नाही त्याच्याबरोबर येते ती ओळख आणि अविनाशची खरी ओळख आत्ता कुठे पुढे आयुष्यात येवू लागली आहे. आणि ती म्हणजे साधना . अविनाशची खरी ओळख साधनानेच उमगवून दिली. पण आत्ता ती कुठे आहे. 

कोकणातील एका लहानश्या खेड्यातला तिचा तो पत्ता, "हो असेल ती तिकडे नक्कीच भेटेल मला"

याच आशेने अविनाश त्या गावात पोहचला आयुष्यात कधीही न पाहिलेलं गाव आज तो पाहत होता. बस मधून बाहेर येताच पहिल्यांदा त्याच्या नजरेत भरली ती पाणवठ्यावरून पाणी भरून घरी निघालेल्या स्त्रिया, प्रफुल्लीत हवामान, सकाळच पडलेलं तांबड, अविनाशने हे पाहिलं आणि "आपण शहरात राहून स्वताची जगण्याची शैली एव्हढी ऐसपैस करून ठेवली आहे कि गावामध्ये असणारे नैसर्गिक माधुर्याकडे आपला दुर्लक्ष्य होणे साहजिकच. जर अश्या ठिकाणी साधना सारख  फुल उमलले  तर त्यात वावग ते काय " मनातल्या मनात हसत अविनाश पुढे चालू लागला पारावर बसलेल्या काही लोकांकडे त्याचे लक्ष्य गेले, तिथल्या काही लोकांनी त्याला गावामध्ये कुठे जायचे आहे हे विचारल. साधनाच्या घरातल्यांच नाव सांगताच त्यातल्या एकाने हसतच माझी ब्याग हाथातून घेतली.
"म्या दावतो तुम्हाला पाटलांच घर" अस बोलत तो पुढे पुढे चालू लागला.

चालता चालता त्याला अविनाशने साधनाच्या घराबद्दल विचारायला सुरुवात केली  १५ ते २० मिनिटांचा तो रस्ता आणि त्यामध्ये अविनाशने साधनाच्या पूर्ण कुटुंबाबद्दल माहिती गोळा केली. पण तेव्हाच त्या माणसाने एक कानात आग ओक्ल्यासारखी गोष्ट सांगितली त्याने अविनाशच्या पायाखालची जमीन निस्त्ल्यासारखी झाली. तो बोलला कि 
"मग काय ..ताईसाहेबांच्या  लग्नाला आला वाटत.

"ताई साहेब.... म्हणजे कोण?..... साधना  "  मनात कल्लोळ सुरु झाला पुढे काही विचारणार तोच ....
"पाटील साहेब तुमच पाव्हन आल्यात मुंबईवरून " जोरात ओरडत त्याने पाटलान  बरोबर  त्यांच्या घरातल्या सर्वांना बाहेर येण्याच आमंत्रण दिल. हा हा म्हणता जवळ जवळ वीस एक लोकं बाहेर अंगणात येवून उभी राहिली पण त्यामध्ये साधना अविनाश ला कुठेच दिसली नाही.

कोणीही अविनाशला ओळखत नव्हत सार्वजन अपुर्क्तेने त्याच्याकडे पाहत होते. पण कोणालाही माहित नव्हत कि हा कोण आहे.

कोणी काही विचारय्च्याच आगोदर अविनाशने पुढे येवून विचारले कि :"साधना ....."

हा आवाज ओळखीचा तेव्हडाच आपुलकीचा कोणी हाक मारली मला शोधिक नजरेने साधना पळत बाहेर आली . आणि अविनाशला पाहताच स्तब्ध झाली. 

"साधना .. काही बोलली नाहीस कि तुझे हि काही मित्र इथे येणार आहेत." साधनाचे बाबा करड्या आवाजात बोलले. 

"नाही ... मी विसरले होते . " थोडी घाबरतच साधना बोलली  , actuly हे माझे सर आहेत जिथे मी काम करत होते."

"साधना ... तू लग्न करतीयेस ...." अविनाशने काहीही विचार न करता बोलला .
सार्वजन अविनाशकडे आश्चर्यचकित होवून पाहत होते.साधना डोळ्यांनी अविनाशला काहीही न बोलण्याचा  इशारा करत होती, पण अविनाशने तिला न जुमानता पुढे येवून बोलू लागला 

" साधना ... सर्व काही सोडून आलोय तुझ्यासाठी घर-दार, पैसा  सर्वकाही, जगायला तू शिकवलस, आयुष्या काय हे तू समजावून सांगितलास, पण जेव्हा ते मी समजलो तेव्हा न समजत तू निघून आलीस  .... :"अविनाश न थांबता सर्व काही बोलत होता . नकळत का होईना पण साधनाच्या घरातल्यान समोर हे सत्यं उघड होत होत ...

: "आज तुझ लग्न मोडायचा माझा काहीही उदेयेष नाहीये पण ... एकदा तुझ्या मनात काय आहे ते कळू दे  मग मी निघून जायीन "   
त्याच्या या शब्दांवर विश्वास कसा ठेवावा हे साधनाला कळत नव्हत... कुठे तरी तिच्या मनात हि अजून प्रशांत घोंगावत होता ...: हा हि प्रशांत सारख मला सोडून तर जाणार नाही ना .." हा प्रश्न  ती तिच्या मनाला सारखा विचारात होती.तेव्हाच तिने तिच्या बाबांकडे वळून पाहिलं ... साधनाच्या बाबांनी आपल्या मुलीला प्रेमाच्या विरहात रडताना पाहिलं होत आणि आज प्रेम तिच्याकडे चालून आल होत त्यांनी हि जास्त विचार  न करता होकार अर्थी मान हलवली 

" हो" साधना मंद डोळ्याच्या झोकातून अविनाशकडे पाहत बोलली .

अविनाशला विश्वास बसत नव्हता पण हो हे खर होत . डोळ्यातून त्याच्या अश्रू वाहू लागले.आणि ते पुसतच पुढे येवून तिच्या बाबाना बोलला 
"काही काळजी करू नका तुमच्या मुलीला फार सुखात ठेवेन मी ,पण आज साधनाच्या या लग्नात ......"

बाबांनी मध्येच अविनाशला थांबवत म्हंटले " लग्न तर होणार ज्या मुलाबरोबर ठरले आहे त्याच्याबरोबरच होणार "
"म्हणजे" थोड्याश्या काळजीने अविनाश उत्तरला 
"अविनाश हि लगनाची तयारी मझ्या नव्हे ताईच्या लग्नाची आहे " साधना हसतच  बोलली 

हे ऐकून अविनाश थाडा खजील झाला. आणि गालातल्या गालात हसत साधनाकडे पाहत राहिला ..............



समाप्त 



  
  


                

1 comments:

सौ गीतांजली शेलार म्हणाले...

छान आहे. कथा माणसाचं मन समृद्ध आणि उल्हासित करणारी असावी. तुमची कथा उत्कंठेला नेऊन आनंदाचा एक मोहक क्षण देऊन जाते. आतपर्यंत एकच कथा वाचली आहे वेळ मिळेल तेव्हा बाकीच्या पोस्ट नक्की वाचणार आहे. मीही आता नवीनच ब्लॉग लिहित आहे. सांजवेळ... कथा लिहिण्याचा प्रयन्त केला आहे.