१० डिसें, २०११

माझा ट्रेन प्रवास



आपल्या  आजूबाजूला  अजून  कितीतरी  निरनिराळी  आणि   विविधरंगी   माणसं  जगतात  आणि  राहतात  हे  जाणण्याचे आणि ओळखण्याचे   एकमेव  ठिकाण  म्हणजे  ट्रेनचा  प्रवास आणि स्टेशन होय 

काही  दिवसांपूर्वी  कुर्ला  स्टेशनवर    एक  मुलगा  भेटला  त्याला  पनवेलला  जायचे  होते  . पण  कुठल्या प्ल्याटफोम  वर  योग्यती ट्रेन भेटेल हे त्याला   समजत  नव्हतं,  त्यात  तो  मुंबईत नवीन  असल्याने  indicator  समजण्यास  त्याला  अवघड  जात  होते .  योगायोगाने  मी  हि  त्याबाजूला  जात  होतो . “ मी  हि  तिकडेच  चाललो  आहे  , माझ्याबरोबर  चल ” असे  बोलून  तिथून  आम्ही  दोघेजण  पनवेलला  निघालो.

त्या  अर्ध्यातासाच्या  भेटीमध्ये  मी  काही  वेळ त्या मुलाच्या जागी स्वताला ठेवून   भूतकाळात  गेलो .


 सहा  सात  वर्ष्याआगोदर  जेव्हा  मी  मुंबईमध्ये  आलो  तेव्हा  हा  प्रवास  पूर्णपने  अनोळखी  होता . तस म्हंटल तर ट्रेनचा प्रवास काही माझ स्वप्न वैगैरे नव्हत पण मला  ट्रेनची भीती वाटत होती .ट्रेन  पाहताच  मनात  चलबिचल  व्हायची  पाय  ट्रेनमध्ये  टाकताना  दहावेळा  विचार  करायचो  अजूनही  ट्रेन  स्टेशनमध्ये  जेव्हा  येते  , तेव्हा  एक  भीती  वाटत  असते . या  काही  वर्ष्यामध्ये. या  फोबिया वर  मात  करण्यास तरी मी यशस्वी झालो  . 

स्टेशनवर  गेल्यावर  कोणत्या  दिशेला  मला  जायाचे  आहे . हे  समजण्यासाठी  चार  पाच  जनाना  विचारावे  लागे .  त्यातले  काही  जन   “ indicator समजत  नाही  का ... “, अस  बोलून  पुढे  निघून   जात   तर  काही  जन  नवीन  आहे  हे  समजून  मार्गदर्शन  करी  . कधीकधी इतके  अजब  प्राणी  भेटत  “हो  प्राणीच  बोलेन ” त्यांच्याबद्दल  बोलण्यासाठी  हि  जागा  नक्कीच  योग्य नाही  , अश्यावेळेस  तर  ट्रेन  मधून मनात नसतानाही  पुढच्या  स्टेशनला  उतरणे   योग्य   समजले .

कधी  गच्च  भरलेल्या  ट्रेन  मध्ये  खिसेकापूंची भीती  असल्याने “ट्रेनमध्ये  चढताच  ब्याग   पुढे  घ्यावी ” हा  माझ्या  दादाने  दिलेला  कानमंत्र  मी  अजूनही  नित्यनेमाने  पाळतो .

हार्बर लाईन वर  राहत  असल्याने  वेस्टर्न  लाईन   आणि  सेट्रल  तशी  नवीनच  त्यात  अत्ता  माझ  ऑफिस  वेस्टर्न  लाईनला  असल्याने  त्या लाईनचा   काहीसा  अंदाज  मला  आला  आहे .... आणि सेट्रल लाईन  अजूनही  अनामिकच . 

पण  खरच  ट्रेन  हि  मुंबईची  रक्तवाहिनी  आहे  हे  खरच . एक  दिवसाच्या  मेगा ब्लोक असो वा मोटरमन चे संप , यामुळे होणारे प्रवाश्यांचे  हाल  याचा  सर्वात  मोठा  पुरावा  आहे .  परप्रांतीय   असो  वा  इथलाच  कोणी . मुंबईमध्ये  माणसांनी  जरी  माणसाना स्वतापासून  दूर  ठेवल  असले  तरी  ..या  सर्वाना  जवळ  करून  आपलस  या  ट्रेननीच    केलंय  असं  म्हणन  काही  चुकीच ठरणार  नाहीये .... 

११ जून, २०११

पाऊस आणि मी .....

पाऊस ....  नाव घेताच अंगात हूर हुरी भरते. थंडी वाजून येते. आज सकाळ पासून पावसाची लागलेली हि धार मनात आठवणींचा कोरड्या कोपरयात ओलावा पुन्हा घेवून आला आहे. 

मुळचा महाबळेश्वरचा  असल्याने पाऊस माझ्यासाठी काही नवीन नाही. आणि त्याबरोबर येणारी थंडी "अरे बाप रे" .
पाऊस सुरु होताना पहिल्यांदा ज्या गारा पडतात त्या वेचताना जी आमची पळापळ व्हायची ती आज हि आठवली तर हळूच खुदकन हसू येत. मी वेचलेल्या गारा कधीच मला नीट खाता नाही आल्या कारण शेवट पर्यंत सर्वांच पाणी झालेलं असायचं. नंतर दादा कडे रडवेल्या चेहऱ्याने पाहायचं. आणि नंतर त्याच समजावन आज डोळ्यात आसवांची गर्दी करत .

शाळेत असताना ऊन्हाळी सुट्टी असते तशी आमच्याकडे पावसाळी सुट्टी असायची. पूर्ण सुट्टी आजी बरोबर तिच्या उबदार गोधडीत तिच्या गोष्टी ऐकत तर कधी बाबांबरोबर पावसाळी सुट्टीचा आभ्यास पूर्ण करण्यात जाई. हीच वेळ असायची जेव्हा मला माझ्या घरातल्यांबरोबर वेळ मनापासून घालवायला मिळे. नाहीतर अर्ध वर्ष तर माझ पांचगणी च्या वसतिगृहात जाई. 

पाऊस थांबताच सर्व जन आळोखे पिळोखे देवून घराबाहेर निघायचो आणि एकत्र येवून 
"पाऊस आणि माझा अनुभव " या विषयावर सर्व जन तासंतास गप्पा मारायचो. पाऊस शांत झाल्यावर येणार ते धुक आणि तो गारवा आणि त्यातच संध्याकाळी  गरम गरम कॉफ्फी बरोबर , गरम जलेबी नाही तर कांदा भजी " सही यार" 
त्यानंतर हा असा योग फक्त दरवर्षीच्या  पावसाळ्यातच.

पण  आज या पावसाळ्यात फक्त आठवणीच आहेत त्यात आठवणी साठवून ठेवण्यासारख काही नाही . कदाचित हरवलेलं बालपण या सर्वांसाठी जवाबदार असेल. नाहीतर सध्याची प्रगतशील स्थिती जी आठवणीच्या पलीकडे  जावून देताच नाही. नजर त्या पलीकडे जाण्या अगोदरच पाठीमागून हाक ऐकू येते  ती वर्तमानाची जो माणसाला भूतकाळात रामू देत नाही आणि भविष्यात जावू राहू देत नाही ............



   



        

२६ मे, २०११

मनाचिये गुंती---चौदा

मनातील स्वप्ने जेव्हा अस्तित्वात येणार असे भासू लागते तेव्हा कुठे जगण्याची मजा येवू लागते. पण अस्तित्व कधी हि एकट येत नाही त्याच्याबरोबर येते ती ओळख आणि अविनाशची खरी ओळख आत्ता कुठे पुढे आयुष्यात येवू लागली आहे. आणि ती म्हणजे साधना . अविनाशची खरी ओळख साधनानेच उमगवून दिली. पण आत्ता ती कुठे आहे. 

कोकणातील एका लहानश्या खेड्यातला तिचा तो पत्ता, "हो असेल ती तिकडे नक्कीच भेटेल मला"

याच आशेने अविनाश त्या गावात पोहचला आयुष्यात कधीही न पाहिलेलं गाव आज तो पाहत होता. बस मधून बाहेर येताच पहिल्यांदा त्याच्या नजरेत भरली ती पाणवठ्यावरून पाणी भरून घरी निघालेल्या स्त्रिया, प्रफुल्लीत हवामान, सकाळच पडलेलं तांबड, अविनाशने हे पाहिलं आणि "आपण शहरात राहून स्वताची जगण्याची शैली एव्हढी ऐसपैस करून ठेवली आहे कि गावामध्ये असणारे नैसर्गिक माधुर्याकडे आपला दुर्लक्ष्य होणे साहजिकच. जर अश्या ठिकाणी साधना सारख  फुल उमलले  तर त्यात वावग ते काय " मनातल्या मनात हसत अविनाश पुढे चालू लागला पारावर बसलेल्या काही लोकांकडे त्याचे लक्ष्य गेले, तिथल्या काही लोकांनी त्याला गावामध्ये कुठे जायचे आहे हे विचारल. साधनाच्या घरातल्यांच नाव सांगताच त्यातल्या एकाने हसतच माझी ब्याग हाथातून घेतली.
"म्या दावतो तुम्हाला पाटलांच घर" अस बोलत तो पुढे पुढे चालू लागला.

चालता चालता त्याला अविनाशने साधनाच्या घराबद्दल विचारायला सुरुवात केली  १५ ते २० मिनिटांचा तो रस्ता आणि त्यामध्ये अविनाशने साधनाच्या पूर्ण कुटुंबाबद्दल माहिती गोळा केली. पण तेव्हाच त्या माणसाने एक कानात आग ओक्ल्यासारखी गोष्ट सांगितली त्याने अविनाशच्या पायाखालची जमीन निस्त्ल्यासारखी झाली. तो बोलला कि 
"मग काय ..ताईसाहेबांच्या  लग्नाला आला वाटत.

"ताई साहेब.... म्हणजे कोण?..... साधना  "  मनात कल्लोळ सुरु झाला पुढे काही विचारणार तोच ....
"पाटील साहेब तुमच पाव्हन आल्यात मुंबईवरून " जोरात ओरडत त्याने पाटलान  बरोबर  त्यांच्या घरातल्या सर्वांना बाहेर येण्याच आमंत्रण दिल. हा हा म्हणता जवळ जवळ वीस एक लोकं बाहेर अंगणात येवून उभी राहिली पण त्यामध्ये साधना अविनाश ला कुठेच दिसली नाही.

कोणीही अविनाशला ओळखत नव्हत सार्वजन अपुर्क्तेने त्याच्याकडे पाहत होते. पण कोणालाही माहित नव्हत कि हा कोण आहे.

कोणी काही विचारय्च्याच आगोदर अविनाशने पुढे येवून विचारले कि :"साधना ....."

हा आवाज ओळखीचा तेव्हडाच आपुलकीचा कोणी हाक मारली मला शोधिक नजरेने साधना पळत बाहेर आली . आणि अविनाशला पाहताच स्तब्ध झाली. 

"साधना .. काही बोलली नाहीस कि तुझे हि काही मित्र इथे येणार आहेत." साधनाचे बाबा करड्या आवाजात बोलले. 

"नाही ... मी विसरले होते . " थोडी घाबरतच साधना बोलली  , actuly हे माझे सर आहेत जिथे मी काम करत होते."

"साधना ... तू लग्न करतीयेस ...." अविनाशने काहीही विचार न करता बोलला .
सार्वजन अविनाशकडे आश्चर्यचकित होवून पाहत होते.साधना डोळ्यांनी अविनाशला काहीही न बोलण्याचा  इशारा करत होती, पण अविनाशने तिला न जुमानता पुढे येवून बोलू लागला 

" साधना ... सर्व काही सोडून आलोय तुझ्यासाठी घर-दार, पैसा  सर्वकाही, जगायला तू शिकवलस, आयुष्या काय हे तू समजावून सांगितलास, पण जेव्हा ते मी समजलो तेव्हा न समजत तू निघून आलीस  .... :"अविनाश न थांबता सर्व काही बोलत होता . नकळत का होईना पण साधनाच्या घरातल्यान समोर हे सत्यं उघड होत होत ...

: "आज तुझ लग्न मोडायचा माझा काहीही उदेयेष नाहीये पण ... एकदा तुझ्या मनात काय आहे ते कळू दे  मग मी निघून जायीन "   
त्याच्या या शब्दांवर विश्वास कसा ठेवावा हे साधनाला कळत नव्हत... कुठे तरी तिच्या मनात हि अजून प्रशांत घोंगावत होता ...: हा हि प्रशांत सारख मला सोडून तर जाणार नाही ना .." हा प्रश्न  ती तिच्या मनाला सारखा विचारात होती.तेव्हाच तिने तिच्या बाबांकडे वळून पाहिलं ... साधनाच्या बाबांनी आपल्या मुलीला प्रेमाच्या विरहात रडताना पाहिलं होत आणि आज प्रेम तिच्याकडे चालून आल होत त्यांनी हि जास्त विचार  न करता होकार अर्थी मान हलवली 

" हो" साधना मंद डोळ्याच्या झोकातून अविनाशकडे पाहत बोलली .

अविनाशला विश्वास बसत नव्हता पण हो हे खर होत . डोळ्यातून त्याच्या अश्रू वाहू लागले.आणि ते पुसतच पुढे येवून तिच्या बाबाना बोलला 
"काही काळजी करू नका तुमच्या मुलीला फार सुखात ठेवेन मी ,पण आज साधनाच्या या लग्नात ......"

बाबांनी मध्येच अविनाशला थांबवत म्हंटले " लग्न तर होणार ज्या मुलाबरोबर ठरले आहे त्याच्याबरोबरच होणार "
"म्हणजे" थोड्याश्या काळजीने अविनाश उत्तरला 
"अविनाश हि लगनाची तयारी मझ्या नव्हे ताईच्या लग्नाची आहे " साधना हसतच  बोलली 

हे ऐकून अविनाश थाडा खजील झाला. आणि गालातल्या गालात हसत साधनाकडे पाहत राहिला ..............



समाप्त 



  
  


                

३ मे, २०११

मनाचिये गुंती -----तेरा

प्रेम नकळत घडत, समजण्याच्या आतच नजरेपासून दुरही जात. जेव्हा जवळ असते तेव्हा त्याची किमत नाही समजत... दूर गेल्यावर त्याच्या दुराव्यात अश्रू ढाळन्यापालीकडे माणूस काही करू शकत नाही.  ती वेळ ती स्थिती माणसाला मरणाच्या यातना देवून जाते.... काहीस असच अविनाश आणि साधनाच्या आयुष्यात घडलं, प्रेम झाल पण नकळत पण समजताच ते तितक्या दूर हि गेलं. आज कुठे आहेत ते.....
 सहा महिने उलटले जग जिथल्या तिथे पण अविनाश त्याही जगाच्या पलीकडे कुठेतरी साधनाची वाट पाहत. त्या रात्री पार्टीनंतर नंदिनिशी झालेलं ते भांडण छे.. छे .. भांडण नव्हे ते तर दोघांनीही एकमेकांना दिलेली समजूतदार नात्याची पोचपावती  होती 

"जे काही झाल त्यात साधनाची काहीही चुकी नाहीये ...काही वेळपर्यंत तर मीही या सत्य पासून अन्भिग्न होत कि मी साधनावर प्रेम करतो "काहीश्या अपराधी भावनेने मान खाली घालून अविनाश नंदिनीला सांगत होता. आणि नंदिनी फक्त शांत पणे हे सर्व ऐकत होती.. "नंदू .. तूच बोल ... तीन वर्ष्याच्या आपल्या संसारात एक तर तू होतीस नाहीतर मी एकत्र आपण कधीच नव्हतो का अस व्हाव हा संसार तडजोडीवर  उभा होता .प्रेमावर कधीच नाही मग आपण एकत्र राहण किती योग्य आहे " 

  "काय बोलायचं तरी काय तुला " नंदिनी उत्तरली .
'हेच कि आपण वेगळे होऊया". अविनाश सहज पणे बोलून गेला पण नंदिनी काहीही न बोलता तिथून निघून गेली.


रात्रभर ती या गोष्टीचा मागोसा घेत होती कि तीच काय चुकल अविनाशच मन जिकण्यासाठी ती कुठे कमी पडली. भिजलेल्या डोळ्यांनी ती रात्र संपली आणि सकाळी अविनाश समोर येवून तिने वेगळ होण्याच्या त्याच्या निर्णयाला दुजोरा दिला" 

त्यानंतर आज सहा महिन्यानंतर न अविनाश साधनाला भेटला ना साधना अविनाशला. कुठे गेली ती का भेटत नाहीये ती मला, मी तिच्यासाठी सर्व काही सोडून आलो पण ती ..... समुद्राच्या त्या संथ लाटांकडे पाहून तेव्हड्याच आवेगाने  अविनाश विचार करत होता. मराठेंकडे विचारपूस केली पण त्यांनीही काहीही सांगायला नकार दिला. काही पर्याय उरला नव्हता तिला भेटण्याचा.... 


तेव्हड्यात त्याला आठवलं साधनाच गाव तीच घर, तिची माणसं.. कश्यावरून ती तीथे गेली नसेल. मनातील घालमेल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या गावी जन योग्य आहे कि नाही याचा तो विचार करत होता पण त्याच्याच मानाने उत्तर दिल, आत्ता नाही गेलो तर कधीच नाही जावू शकणार जर विधात्याच्या मनात असेल तर आम्ही भेटूच पण त्यासाठी करावी लागणारी मेहनत विधात्याला नाही मलाच करावी लागणार.


तिथून उठताच तो घरी गेला. पण हे घर ते नव्हत जिथे तो नंदिनी बरोबर राहत होता हे ते घर होत जिथे तो लहानाचा मोठा झाला. जिथे त्याच्या आई वडिलांनी त्याला या जगात जगायला शिकवलं होत. माणूस म्हणून जगात कस वावराव हे समजावून सांगितल होत पाहिलं पावूल, पहिले बोबडे बोल, जिथे उमटले तिथे तो सहा महिन्यापूर्वी पुन्हा आला होता


घरात येताच त्याच्या रूममधील पडलेली काही अस्तावेस्त कागद पत्रे तो चाचपडू लागला . त्याचा हा आताताईपणा  पाहून त्याची आई थोडीशी घाबरली जणू तिला भीती होती कि आपला मुलगा आपल्याला सोडून पुन्हा जाणार तर नाही ना.म्हणूनच न राह्वाता तिने विचारल 
"काय झाल  अवी... काही प्रोब्लेम" 
त्याने मागे वळून पाहिलं .. त्याची आई तिथे होती तिची ओघळती नजर पाहून त्याने तिला झालेला सर्व प्रकार सांगितला 

थोडा वेळ स्तब्ध राहून त्या माउलीने साधनाला पाहण्याची इच्छा दर्शविली "खर्च अवी मला तिला पाहायचं.. अशी कोण ती मुलगी जिने तुला माणूस बनविल मला पहायचं तिला "

"हो आई .. मी तिचा तो पत्ता शोधतोय पण सापडतच नाहीये. तेव्हड्यात त्याच्या हाथात एक फाईल आली ज्यामध्ये त्याच्या काही स्टाफ चे resume होते . ती फाईल घेवून तो टेबलाजवळ आला आणि त्या मध्ये साधनाचे resume शोधू लागला. आणि तो भेटला ....... त्यावर तिचा गावातला पत्ता लिहला होता.

त्याने खुश होऊन आई कडे पाहिलं ... "मला जाव लागेल तिच्याकडे ...तिला आणायला "


हे ऐकताच  दरवाज्याशेजारी उभे असणारे अविनाशचे वडील थोड्या वेळासाठी थबकले. अविनाशने व तिच्या आईने त्यांच्याकडे पाहिलं . आणि काहीही न बोलता आपला चष्मा पुसत ते तिथून निघून गेले. आईने नजरेने  खुणवून बाबाना समजवण्यास सांगितले. .. आणि बाबाण पाठोपाठ अविनाश हि  निघाला   


बाहेर परसात बाबा बसले होते. त्यांच्या जवळ जावून अविनाश हळूच बोलला
 "अरे... हे काय . हे जास्वंदीच झाड किती मोठ झाल ना ... बाबा जेव्हा फुलं येतात तेव्हा फार बर वाटत असेल ना कि आपण या झाडाला मोठ केल, फुल देण्यास आपण समर्थन केल म्हणून....
" नाही!"  अविनाशकडे पाहत बाबा बोलले
 "त्याच्यापेक्षाहि जास्त दु:ख  तेव्हा होत. जेव्हा ती त्या झाडाची पान फुल झडायला सुरुवात होते. कारण माहित असत कि या वेदना काही क्षणापुर्त्या असतात पण त्या झाडाला कोण सांगणार त्याच्या वेदना कोण झेलणार किती हि पाणी घालून मोठ केल तरी त्याच्या वाट्याला आलेल्या वेदना त्यालाच झेलाव्या लागणार मला नाही" हे ऐकताच अविनाशला कळून चुकल हा टोमणा होता त्याच्या भूतकाळाला.

"बाबा .. ती माझी घोडचूक होती . त्याबद्दल मी माफी मागितली आहे. माहिती आहे तुमच्या मनात अजूनही कुठे तरी एक बोचणी आहे कि मी तुम्हाला माझ्या स्वप्ननसाठी सोडून जाईन. हो ना..! "

केविलवाण्या नजरेने बाबानी  त्याच्याकडे पाहिलं :"माझ काही नाही रे तुझ्या आईच काय ती कशी जगेल "
अहो पण मी तुमच्यासाठीच जातोय साधनाला आणायला please  बाबा मला  एक संधी द्या . मी लवकरच येईन "
एक नजर वरती गच्ची वर उभी असणारी अविनाशची आईकडे पाहत बाबांनी अविनाशला होकार दिला. आणि डोळ्यातले पाणी पुसत अविनाशला मिठी मारली........दोन बापाला आणि मुलाला अस पुन्हा एकत्र आलेल पाहून अविनाशच्या आईने सुठ्केचा निश्वास सोडला कारण ती या दिवसाची वात फार पूर्वी पासूनच पाहत होती. 



पुढील भाग लवकरच   ....
  

   

२५ एप्रि, २०११

मनाचिये गुंती ----- बारा



तिच्या आसवानी जे सांगायचं होतं ते सांगितलं. प्रो. मराठेनी ही फार काही विचारल नाही. आणी तिला शेजारी असणारा पाण्याने काठो काठ भरलेला पाण्याचा तांब्या दिला.
" पी हे पाणी पी ...... आणी त्या पाण्याच्या प्रतेक्क घोटा बरोबर  तुझी ही आसवे ही पी म्हणजे मन ही हलके होइल आणी तुझे  डोळे ही."
तिने ते पाणी पिवून. मराठेंकड़े पहिलं; " यात माझा काय दोष आहे मी तर फक्त तिथे सरानी  बोलावलं म्हनुनच गेले होते. मग .."

"हे बग साधना तूझ्या मनात काही नाही मानतो मी पण अविनाशचं काय कदाचित नंदिनी जे काही बोलली त्यात काही तरी सत्य असावं. नाहीतर ही अशी चुक नंदिनी सारख्या बाईकडून होन अशक्य आहे.:" आपली शंका विचारत मराठे बोलले.

"नाही ..." थोडं भांबावून साधना बोलली. "असं  नाही  होऊ  शकत. का असं होतय. सर मला पुन्हा ते सर्व नकोय. मी खुश आहे.... जी काही आहे ती " थोड्याश्या विचलित होवून साधना बोलत होती.



"का ... स्वताला फसवत आहेस. " साधनाच्या डोक्यावर हाथ  ठेवून  मराठे उत्तरले. "वय हे माणसाच्या शरीराला असतं त्याच्या मनाला नसतं मग हे का होऊ शकत नाही. जसं प्रशांत तुला विसरून, त्याच आयुष्या जगण्यासाठी निघून गेला. आणी तू आहेस की अजुन ही गुरफतुन बसली आहेस तुझ्या त्या भूत्कालात"


"सर असं कसं बोलू शकता तुम्ही, तुम्हाला सर्व माहित असून सुद्धा ...."
"काय ...काय माहित आहे मला प्रशांत ला अजुन ही तू तुझ्या आयुष्यातून बाहेर काढू शकली नाहीस की अविनाशला तुझ्या आयुष्यात येवू  देत नाहीस."


"त्यांच लग्न झाले आहे जरी मी त्यांच्या बद्दल असा काही विचार केला देखिल तरी माझ्यासाठी ती माझी फसवणूक असेल. "  
त्रस्त होउन मराठे ओरडले "तू तुझा विचार का करत नाहीयेस. तू अविनाशला आवडतेस. तुम्ही दोघानी एकत्र येणे, दोघांसाठी भल्याचे असणार आहे. तू हा विचार का करत नाहीयेस.: 


साधना स्तब्ध झाली काही वेळ तिला तिच्या स्वार्थासाठी विचार करण्यासाठी मराठेनी एकट सोडलं.


त्या एकट्या क्षणी साधना काय विचार करणार हे मराठेना माहीत होत, तरी देखिल त्यानी तिथून जान सोयीस्कर समजल....


'प्रेम पुन्हा होऊ शकत... नाही मग मनाच काय ते तर अगोदरच कोणाला तरी दिलेलं असतं मग त्याच काय ... नाही हा माझा भ्रम आहे दुसरं काही नाही ,, छे.. अविनाश प्रशांतची जागा घेवुच शकत नाहित. मी पहीली ही प्रशांतची होती आणी आज ही प्रशांत चीच आहे...."
मनामध्ये सुरु असलेले शब्द कल्लोळ तिला निर्णय घेण्यास भाग पाडत होते पण साधना घाबरत होती स्वताच्या मनाला कि समजाला .... कि पुन्हा प्रेमात पडण्याला ,,,,,